जालना- दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तो यालाच! अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे. त्यापूर्वीच दिवस-दिवस विद्युत पुरवठा खंडित होणे मागील आठ दिवसांपासून सुरू आहे. त्यातच अवकाळी पाऊस पडून गेल्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, तर वीज वितरण कंपनीचे अधिकारी नॉट रिचेबल आहेत .अशा परिस्थितीमध्ये, नूतन वसाहत परिसरात असलेले रोहित्र (DP)ने आज दुपारी पाच वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला आणि यामध्ये रोहित्र जळून राख झाले आहे. 

https://youtu.be/LSfwvoZdRig?si=ZkF19V0kfTcBBIz9

सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही परंतु या रोहित त्रास शेजारी  उभ्या असलेल्या एका चार चाकी वाहनावर रोहित्र जळताना आगीचे मोठे लोड  पडले आणि वाहनाचे नुकसान झाले आहे. परिसरात असलेल्या व्यावसायिकांनी वेळीच प्रसंगावधान लक्षात घेऊन बंद असलेले हे वाहन ढकलत इतरत्र नेले त्यामुळे वाहनाचा होणारा मोठा स्फोट टळला. ही आग एवढी भयानक होती की आगीचे उंचच्या उंच लोळ गेले आणि रोहित्रावरून जाणारे फायबर ऑप्टिक च्या केबलने पेट घेतला.  रोहीत्र जळून खाक झाल्यानंतरआणिआग विझविल्यानंतर बराच वेळ हे फायबर ऑप्टिक जळतच राहिले. या Dp वरून प्रयाग नगर आणि उत्तमचंद जांगडा नगरला वीज पुरवठा होतो .दरम्यान वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीची पाहणी केली परंतु आज विद्युत पुरवठा सुरळीत होईल याची शक्यता नसल्याचे सांगितले.

दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version