जालना- जालना -नांदेड समृद्धी महामार्गात जालना तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू केला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून शेत जमिनीचे पूर्ण पुनर्मूल्यांकन झाले नाही. त्यामुळे या जमिनी शासन कवडीमोल भावाने खरेदी करत आहे आणि याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. शासनाने बाजारभावाप्रमाणे या जमिनीचे पुनर्मूल्यांकन करावे अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे .यासंदर्भात या प्रकल्पात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या अडचणीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी मध्यस्थ केली परंतु या चर्चेतून फार काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हे शेतकरी आत्महत्या करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. दरम्यान प्रशासनाच्या वतीने सकारात्मक भूमिका घेऊन सुमारे 500 शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेतल्या आणि त्यामधून 52 शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती केली आहे आणि या 52 शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे .
https://youtube.com/@edtvjalna5167?si=Au7f6C5RR3ANSPeH
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर
९४२२२१९१७२