जालना- अवकाळीच्या फटक्यात जालना जिल्हा चांगलाच होरपळून निघाला आहे .जीवित हानी मध्ये सर्वात जास्त नुकसान भोकरदन तालुक्याचे झाले आहे. शेतीच्या नुकसानीत बदनापूर आघाडीवर आहे. तर या दोन्ही नुकसानी मधून अंबड हा एकमेव तालुका बचावला आहे.   

खरंतर यावर्षी पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील असा अंदाज सर्वांनी बांधला होता. प्रशासकीय यंत्रणा देखील त्या पद्धतीने कामाला लागली होती. परंतु हा अंदाज चुकला आणि फटका बसला तो अवकाळीचा .जालना जिल्ह्यात सर्वात जास्त जीवित हानी ही भोकरदन तालुक्याची झाली आहे. या जीवित हानी मध्ये सहा व्यक्तींचा 13 लहान दुधाळ जनावरांचा, वीस मोठ्या दुधाळ जनावरांचा तर दहा ओढकाम करणाऱ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील हा सर्वात मोठा म्हणजे 43 एवढा आकडा आहे .त्या पाठोपाठ बदनापूर आणि जाफराबाद प्रत्येकी 11 ,परतुर आठ, घनसावंगी 7, मंठा 4, जालना 3, अशी आकडेवारी आहे. तर आंबड मध्ये एकाही सजीवाची मृत्यू झाल्याची नोंद शासनाकडे नाही.

      शेती आणि घरांच्या पडझडीमध्ये बदनापूर तालुका आघाडीवर आहे .बदनापूर मध्ये एकूण 21 बाधित गावांमध्ये 1911 शेतकऱ्यांचे बागायतीमध्ये 447 तर फळ पिकामध्ये 748 हेक्टर हेक्टर असे एकूण बारा हजार 32 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ जालना तालुक्याचा क्रमांक आहे .यामध्ये 65 गाव बाधित झाले आहेत .664 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे तर बागायतीमध्ये 380 तर फळ पिकात सुमारे पाच हेक्टर अशा एकूण 385 हेक्टर क्षेत्राला अवकाळीच्या फटका बसला आहे. या दोन्ही संकटांमधून अंबड तालुक्याला मात्र कुठलीच हानी पोहोचलेली नाही. एकूण सरासरी पाहता या अवकाळीमुळे जालना जिल्ह्यात 87 सजीवांचा जीव गेला आहे तर 1925 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे.

*https://youtu.be/QhATkvgKYVg?si=htKA8JhCmbLLgGRc
*https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
*Web-www.edtv.com
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version