जालना- गावातच असलेल्या भाच्याला हळद लावण्यासाठी गेलेल्या मामीच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगर भागात सोमवार दिनांक 26 रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
हा एवढा ऐवज चोरीला गेला आहे
इंदिरानगर भागात राहणाऱ्या संगीता कचरू पिंपराळे वय 44 वर्ष यांचे भाग्यनगर येथे राहत असलेल्या काकासाहेब हरिहरराव जटाळे या भावाच्या मुलाचे लग्न आहे . भाच्याला हळद लावण्यासाठी संगीता पिंपराळे या गेल्या होत्या. रविवारी दुपारी एकच्या सुमारास त्या पुढे गेल्या आणि पाठीमागून दोन तासाने त्यांची मुलगी गेली .रात्री उशिरापर्यंत हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर संगीता पिंपराळे यांच्या मुलाने इंदिरानगर भागातील घरी चक्कर मारली आणि घर व्यवस्थित आहे का नाही ते पाहणी केली. यावेळी घराला जसे कुलूप लावले होते तसे सुस्थितीत ते दिसले. रात्रीच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून त्यांनी काकासाहेब जटाळे यांच्या घरीच मुक्काम केला. सकाळी साडेआठ वाजता पिंपराळे कुटुंब घरी आल्यानंतर घराचा कडी कोयंडा तोडलेला दिसला. त्यानंतर घरात जाऊन पाहिल्यानंतर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले, कपाटही तोडलेले दिसले आणि चोरी झाल्याचे लक्षात आले. दरम्यान याप्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे .संगीता पिंपराळे यांनी दिलेला तक्रारीनुसार चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिन. चोरट्यांनी लंपास केले आहेत.
https://youtu.be/QhATkvgKYVg?si=htKA8JhCmbLLgGRc
*https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
*Web-www.edtv.com
-दिलीप पोहनेरकर,
9422219172