जालना- राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधात्मक कायदा लागू असताना देखील ईदच्या दिवशी गोवंशाची हत्या करण्यात आली? ही हत्या होऊ नये म्हणून गोसेवा आयोगाने देखील राज्यातील पोलीस प्रशासनाला ,कृषी उत्पन्न बाजार समितीला महानगरपालिकांना नगरपालिकांना सक्त सूचना देऊन यावर नियंत्रण ठेवण्याचे सांगितले होते .

असे असतानाही जालन्यात गोवंशाची कत्तल झाल्याचा आरोप बजरंग दलाच्या वतीने करण्यात आला . जालना शहरातील दुःखी नगर ते रामतीर्थ स्मशानभूमीच्या दरम्यान असलेल्या नदीकाठी मोठा खड्डा करून ईदच्या दिवशी कत्तल केलेल्या जनावरांचे अवशेष टाकण्यात आले. या अवशेषांची  दुर्गंधी परिसरात सुटल्यानंतर सोमवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणची पाहणी केल्यानंतर त्यांना गोवावंशाचे अवशेष आढळून आले आणि त्यांनी अचानक बस स्थानक परिसरात रास्ता रोको केला .

             FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa

दिलीप पोहनेरकर –९४२२२१९१७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version