जालना- जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या पिक विमा, अतिवृष्टी या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. प्रथमदर्शनी हा 52 कोटींचा होता त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची शहानिशा केल्यानंतर फक्त अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यात हा 35 कोटींचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये 25 लाखांच्यावर डल्ला मारणारे तलाठी आणि महसूल अधिकारी असे सुमारे 26 कर्मचारी निष्पन्न झाले .त्या 26 कर्मचाऱ्यांपैकी दहा कर्मचाऱ्यांना यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता पुन्हा सात कोटींचा आकडा वाढला आहे आणि 42 कोटींच्या या शेती अनुदानाच्या घोटाळ्यामध्ये दिनांक 19 रोजी पुन्हा जुन्या राहिलेल्या 16 कर्मचाऱ्यांपैकी चार तर नवीन सात असे एकूण 11 कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे.
या घोटाळ्याला फक्त महसूल सहाय्यक आणि तलाठी यांना जबाबदार न धरता त्यांचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या तहसीलदारांनी नायब तहसीलदार यांचीही चौकशी करण्यात आली आणि त्यांच्याकडून खुलासे मागविण्यात आले आहेत अंबड घनसावंगी तालुक्यातील तत्कालीन पाच तहसीलदार आणि सहा नायब तहसीलदारांचे खुलासे जिल्हाधिकाऱ्यांनी मागून पुढील कारवाईसाठी ते शासनाकडे सादर केले आहेत नवीन निलंबित केलेल्या 11 कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्या 16 कर्मचाऱ्यांपैकी डी जी कुरेवाड रक्कम 26 लाख 26 हजार राजू शेख रक्कम 36 लाख एस एस कुलकर्णी रक्कम 33 लाख श्रीमती ज्योती खर्जुले रक्कम 32 लाख 87 हजार त्यासोबत सचिन बागुल ग्राम महसूल अधिकारी एस एम जारवाल ग्राम महसूल अधिकारी श्रीमती डीजी चांदमारे ग्राम महसूल अधिकारी अरबी माळी सहाय्यक महसूल अधिकारी आशिष पैठणकर सहायक महसूल अधिकारी सुशील जाधव सहाय्यक महसूल अधिकारी आणि व्ही डी ससाने महसूल सहाय्यक यांचा समावेश आहे.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२