जालना- जालना जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये विशेष करून मराठवाड्यात हजारो गुंतवणूकदारांना हजार,लाखो नव्हे तर अब्जावधींचा गंडा घालणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण (CID)विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
गुंतवणुकीवर जास्तीचे व्याज देण्याचे आम्हीच दाखवून ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने महाराष्ट्रात जाळे पसरवले होते. या माध्यमातून अनेक व्यवसाय सुरू केले होते त्यातीलच एक होता तिरूमला ऑईलचा व्यवसाय. दरम्यान गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली रक्कम वेळेत परत न करू शकल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हेही दाखल झालेले आहेत. या संदर्भात या संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, संचालक आशिष पाटोदेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वच पोलीस ठाण्यांनी अटक करून न्यायालयात देखील हजर केले होते. दरम्यान या गुन्ह्याची व्याप्ती पाहता हा तपास संबंधित जिल्ह्यांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. परंतु या शाखेला देखील काही मर्यादा आहेत. त्यांच्या मर्यादेनुसार त्या- त्या पोलिस अधिकाऱ्यांनी हा तपास पूर्ण केला आहे. कुटे ग्रुपच्या मालमत्ता देखील जप्त केलेल्या आहेत .त्यामुळे हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून पूर्ण झालेला आहे. परंतु जप्त केलेल्या मालमत्तांचे पुढे काय ?आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीचे काय? हे प्रश्न मात्र कायम आहेत .त्यामुळेच हा तपास लवकर पूर्ण व्हावा आणि गुंतवणूकदारांना न्याय मिळावा या हेतूने हा तपास आता गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याचा तपास यापूर्वीच वर्ग केला आहे. तर जालना, धाराशिव, आणि छत्रपती संभाजी नगर ग्रामीणचा तपास दिनांक 18 रोजी सीआयडी कडे वर्ग करावा असा आदेश राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक प्रकाश जाधव यांनी काढले आहेत. जालना जिल्ह्यात 11, छत्रपती संभाजी नगर ग्रामीणमध्ये चार आणि धाराशिव मध्ये एक अशा 16 गुणांचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्याची पार्श्वभूमी जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद ,सदर बाजार, अंबड, परतुर, घनसावंगी, तीर्थपुरी ,भोकरदन ,अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. हा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू आहे .या शाखेचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक एम. ए. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे आणि निलेश इधाटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हा तपास पूर्ण केला आहे .एकूण 11 गुन्ह्यांमध्ये तक्रारदारासह सुमारे 4500 गुंतवणूकदारांनी आपल्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदविल्या आहेत आणि त्यानुसार ही रक्कम हजारात लाखात नव्हे तर अब्जावधीमध्ये आहे .म्हणजेच दोन अब्ज 51 कोटी , सोप्या भाषेमध्ये 251 कोटी असे देखील वाचता येईल आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जालना जिल्ह्यातील सुमारे 91 कोटींची मालमत्ता उठवलेली आहे . 91 कोटी हा आकडा शासकीय मूल्यांकनानुसार होतो. प्रत्यक्षात हा आकडा बाजार मूल्यांकनानुसार चौपट होऊ शकतो. तपास लावण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे कर्मचारी, फुलसिंग गुशिंगे, गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे ,रवी गायकवाड, गजू भोसले, अंबादास साबळे ,मंदा नाटकर जया निकम, निमा घनघाव हे कार्यरत होते.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२