जालना- अवघा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वीस ते पंचवीस हजार रुपये महिन्याची नोकरी झटपट उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे पाहिल्या जातं.त्यामुळेच या संस्थेकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे .आजही इथे असलेले सर्व अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या पूर्ण क्षमतेने चालतात. असे असताना इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र प्रचंड दुर्लक्ष आहे. या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांच्या यंत्रसामग्रीचे तर भंगार होतच आहे परंतु अभ्यासक्रम आणि ही यंत्रसामग्री हाताळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवित्ताची हमी घेणार कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गळक्या पत्रांमुळे ना विद्यार्थ्यांना बसायला जागा आहे ना त्यांना प्रात्यक्षिक करायला.

ज्यावेळी या आयटीआय ची निर्मिती झाली त्यावेळेस पासून इथे देखभाल दुरुस्ती झालीच नाही. त्यामुळे आता एकदमच सर्व इमारतीची देखभाल दुरुस्ती निघाली आहे. कार्यशाळेवरील पत्रांची झीज होऊन ती गळायला लागली आहेत आणि हे सर्व पाणी लाखो रुपयांच्या यंत्रसामग्रीवर पडत आहे. ही दुरुस्ती करून द्यावी म्हणून संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाला 29 मे रोजी पत्र दिलेलं आहे. या पत्राच्या अनुषंगाने बांधकाम विभागाने पाहणीही केली आहे आणि त्याचे अंदाजपत्रकही तयार झाले आहे. सुमारे दीड कोटी रुपयांची गरज या दुरुस्तीसाठी लागणार आहे. मूळ प्रश्न आहेत तो हा निधी देणार कोण ?कारण बांधकाम विभाग हा फक्त अंदाजपत्रक तयार करून देतो आणि जर या अंदाजपत्रकानुसार बांधकाम विभागाकडे  रक्कम जमा केली तर दुरुस्ती करून देतो .अन्यथा ज्या त्या संस्थेला स्वतः निधी खर्च करून ती दुरुस्त करावी लागते. दीड कोटी रुपयांचा निधी औद्योगिक संस्थेला उपलब्ध आहे का ?आणि नसेल तर त्यांना तो उपलब्ध करून घ्यावा लागेल. किंवा जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तो मिळवावा लागेल.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा हे आज दिनांक 26 रोजी जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे मोठा मेळावा घेत आहेत. या मेळाव्यावर लाखो रुपयांचा खर्चही होणार आहे .परंतु जे सुरू आहे आणि किरकोळ निधी अभावी त्याची विल्हेवाट लागत आहे त्याला निधी देणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. हे तर झालं विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कार्यशाळेचं. परंतु ज्या ठिकाणी कार्यालयीन कर्मचारी बसतात त्या इमारतीला देखील गेल्या अनेक वर्षांपासून रंगरंगोटी नाही ,टेबल खुर्च्या तुटलेल्या आहेत आणि त्याच सोबत छत्रपती संभाजी नगर जालना महामार्गावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली ही संस्था अतिक्रमणाच्या विळख्यात  आहे. प्रचंड  मोठी आणि मोक्याची जागा असलेल्या या संस्थेवर नांगरणी करून काही दिवसांपूर्वी पेरणी करायची तयारी देखील करून ठेवली आहे. हे सर्व याच संस्थेच्या जागेवर अतिक्रमण करून बसलेल्या चंदंनझीरा पोलीस ठाण्याच्या समोर होत आहे हे विशेष.

                     FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
   *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version