जालना- सरकार जर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नसेल तर, ती छत्रपतिंची नाही तर पाकिस्तान ची औलाद आहे. असं जाहीर वक्तव्य बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांनी केले.

बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी सर्कल आणि भोकरदन तालुक्यातील राजुर सर्कल मधील काही गावांना अतिवृष्टीच्या अनुदानापासून वगळण्यात आले आहे .या पार्श्‍वभूमीवर आज मोती बागेपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोरून पालकमंत्री राजेश टोपे यांच्या घरावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा अंबड चौफुली येथेच पोलिसांनी अडवला आणि त्यानंतर झालेल्या भाषणबाजी मध्ये आमदार कुचे यांनी हे वक्तव्य केलं.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version