जालना – येथील कै. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘दु:खी’ राज्य काव्य पुरस्कार डॉ. प्रज्ञा दया पवार यांना जाहीर झाला असून सिद्धहस्त लेखिका रेखा बैजल यांना साहित्य क्षेत्रातील समग्र योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.कवितेचा पाडवा चे संयोजक विनीत साहनी व डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी शनिवारी ( ता. 19) या पुरस्कारांची घोषणा केली.
प्रज्ञा दया पवार
रेखा बैजल
दरम्यान यापूर्वी मराठीतील प्रसिद्ध कवी फ .मुं. शिंदे, भगवान देशमुख, रामदास फुटाणे, लोकनाथ यशवंत, सौमित्र ,अरुणा ढेरे, अनुराधा पाटील ,डॉ.वृषाली किन्हाळकर, इंद्रजीत भालेराव, विष्णू सूर्या वाघ, राजन गवस, कैलास भाले ,श्रीकांत देशमुख, प्रविण बांदेकर अशा मातब्बर कवींना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले . अशी माहिती विनीत साहनी, अभय साहनी, डॉ.संजीवनी तडेगावकर, पंडित तडेगावकर यांनी दिली.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com–9422219172