जालना -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काल दिनांक 14 एप्रिल रोजी जयंती होती. मस्तगड परिसरात दिवसभर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनुयायांनी आनंदोत्सव साजरा केला, आणि संध्याकाळी मिरवणूकही काढली .रात्री 10 वाजेच्या सुमारास लोखंडी पूल ओलांडल्यानंतर सुभाषचंद्र बोस चौकात ही मिरवणूक आली .अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सुरू असलेल्या मिरवणुकीमध्ये विविध रंगांचे झेंडे फडकायला लागले आणि पाहता पाहता या झेंड्याची टक्कर सुरू झाली. हा सर्व प्रकार मिरवणुकीदरम्यान बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस यंत्रणेच्या लक्षात आला आणि त्यांनी वेळीच हस्तक्षेप केला.
गर्दी मोठी असल्यामुळे कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला काबूत आणले, आणि पुढील मोठा अनर्थ टळला आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
https://edtvjalna.com