जालना -महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी या लोक अदालतीमध्ये आपले प्रकरण ठेवून वेळ आणि पैसा वाचवावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव राजेश आहेर यांनी केले आहे.

या लोकन्यायालयामध्ये जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित मोटार वाहन अपघात ,दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वाद ,तसेच दावा दाखल पूर्वप्रकरणे निकाली काढल्यात येणार आहेत. दोन्ही पक्षकार समोरासमोर असल्यामुळे दोघांचाही वेळ, पैसा वाचतो आणि कटूताही संपते. त्यामुळे लोक अदालितेमध्ये तडजोडीने आपली प्रकरणी मिटवीत असे आवाहनही श्री. आहेर यांनी केले आहे.

ज्या पक्षकारांना ही प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीने मिटवायची आहेत अशा पक्षकारांनी आपल्या वकिलामार्फत अर्ज करावेत किंवा स्वतः सक्षमपणे न्यायालयात येऊन देखील ते अर्ज करू शकतात आणि त्यांना विधी सेवा प्राधिकरणाकडून संपूर्ण मदत दिल्या जाईल अशी माहिती देखील राजेश आहेर यांनी दिली.

वेळेअभावी कोणी पक्षकार आयत्या वेळी जरी लोक अदालतीमध्ये आला तरी देखील त्याच्या प्रकरणात तडजोड केल्या जाईल असेही ते म्हणाले.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version