जालना -महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी या लोक अदालतीमध्ये आपले प्रकरण ठेवून वेळ आणि पैसा वाचवावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव राजेश आहेर यांनी केले आहे.
या लोकन्यायालयामध्ये जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित मोटार वाहन अपघात ,दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वाद ,तसेच दावा दाखल पूर्वप्रकरणे निकाली काढल्यात येणार आहेत. दोन्ही पक्षकार समोरासमोर असल्यामुळे दोघांचाही वेळ, पैसा वाचतो आणि कटूताही संपते. त्यामुळे लोक अदालितेमध्ये तडजोडीने आपली प्रकरणी मिटवीत असे आवाहनही श्री. आहेर यांनी केले आहे.
वेळेअभावी कोणी पक्षकार आयत्या वेळी जरी लोक अदालतीमध्ये आला तरी देखील त्याच्या प्रकरणात तडजोड केल्या जाईल असेही ते म्हणाले.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com