घनसावंगी( बाळासाहेब ढेरे)- रामदास स्वामींनी श्रीरामांच्या ज्या मूर्तींची पूजा केली अशा पंचधातूच्या सुमारे 700 वर्षांपूर्वीच्या मूर्ती, आणि दंडावर बांधलेला हनुमान, पंचायतन असा भावनिक आणि श्रद्धेचा विषय असलेला अमूल्य ठेवा काल चोरट्यांनी चोरून नेला आहे.

या चोरीच्या तपासासाठी सर्वच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. या मूर्तींची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये करोडो रुपये किंमत असल्याचे सांगण्यात येते. जालना जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि आध्यात्मिक क्षेत्राला धक्का देणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील याची गंभीर दखल घेऊन आपल्या खबऱ्यांसह सर्व यंत्रणा सतर्क केली आहे.

दरम्यान घनसावंगी पोलीस ठाणे अंतर्गत हे तीर्थक्षेत्र येत असल्यामुळे घनसावंगी पोलीस ठाण्याची तीन पथके तर चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हा शाखेची पाच पथके चोरट्यांच्या मागावर रवाना झाली आहेत. मात्र अद्याप पर्यंत पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत .असे असले तरी आमच्या एकातरी पथकाच्या हाती हे चोरटे लागतील असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version