अंबड चे माजी नगराध्यक्ष बाबुराव उर्फ भवानीदास भालचंद्र कुलकर्णी यांचे आज सायंकाळी चार वाजून 46 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले , अंबड शहर व परिसरामध्ये ते मालक या टोपण नावाने देखील प्रसिद्ध होते. काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती होती दरम्यान आमदार अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे, आणि काँग्रेसचा एक खंदा शिलेदार हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. त्याच सोबत डॉ. शंकरराव चव्हाण यांचे आणि बाबुराव कुलकर्णी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते त्यामुळे एक पारिवारातील सदस्य हरवला असल्याचेही त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version