जालना -महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस यांचे सरकार भयाने निर्माण झालेले आहे .

ईडी ची भीती दाखवून दाखवून ते एकत्र आले, त्यांचे नावही आता ईडीच सरकार असं पडलं आहे. त्यामुळे हे सरकार म्हणजे “अलीबाबा चाळीस चोरांचे सरकार आहे”. मलिदा खाण्यासाठी आणि राज्याची तिजोरी रिकामी करण्यासाठी एकत्र आलेलं हे सरकार ,महाराष्ट्रासाठी नव्हे तर गुजरात साठी काम करत आहे.

असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. जालना शहरात एका कार्यक्रमानिमित्त नाना पटोले आले होते यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस माजी आमदार नामदेव पवार, यांची उपस्थिती होती. दरम्यान महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले आहेत. त्यामुळे भाजपच्या सरकारवर सडाडून टीका होत आहे . जात असलेली इज्जत ,आणि होणाऱ्या या टिकेला थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात उद्योगासाठी काल निधी देण्याची घोषणा केली आहे .ते घोषणा करण्यात पटाईत आहेत. मात्र हातात काहीच पडत नाही त्यामुळे या सरकारला आम्ही हाकलून लावण्याची गरज नाही, जनताच  हाकलून लावील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version