जालना-न्यायालय म्हटलं की तसे सारे जण दोन हात दूरच राहतात. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया आणि विशेष करून न्यायाधीश पाहायला आणि त्यांच्यासोबत बोलायला फारसं कोणी धजत नाही.कारण त्यांचा राजशिष्ठाचार पाहूनच अनेकांना धडकी भरते. आणि काही शासकीय बंधनांमुळे न्यायाधीशांना देखील सामान्य जनतेत वावरता येत नाही. परंतु आज आठवडी बाजारात मात्र या बंधनातून दोन्ही बाजू मुक्त झाल्या होत्या. सामान्य माणसांना न्यायाधीशांसोबत बोलता येत होते आणि न्यायाधीशांनी देखील तेवढाच प्रतिसाद देत सामान्य माणसांसोबत संवाद साधून विविध शासकीय योजनांची माहिती घेतली .निमित्य होते जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या माहितीचे प्रदर्शन.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com