जालना- पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जालना आणि बदनापूर तालुक्यातील सर्व गावे, तसेच अंबड आणि भोकरदन मतदारसंघातील काही गावांचा समावेश करून एकूण 336 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर ग्रीडला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वता मान्यता दिल्याची माहिती माजी मंत्री अर्जुनराव खोतकर तथा बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपाचे नेते भास्कर दानवे यांचीही उपस्थिती होती. पुढील पंधरा दिवसांमध्ये या वॉटर ग्रीड संदर्भातील आराखडा सादर करण्याच्या सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी सचिवांना दिल्या असल्याचेही या दोघांनी सांगितले.

दरम्यान किती खर्च येईल हे अद्याप सांगता येणे कठीण असले तरी या वॉटर ग्रीड वर होणारा खर्च अर्धा केंद्र सरकार आणि अर्धा राज्य सरकार करणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version