जालना-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील पंच्याहत्तर नद्यांच्या जनजागरण अभियानातंर्गत जालन्यातील कुंडलिका व सीना पुनरुज्जीवन अभियान संवाद यात्रा शनिवार दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली आहे.
कुंडलिका व सीना या दोन नदीपात्रातील कचरा, प्लास्टिक आणि गाळ काढण्यासह नदीपात्रात स्वच्छता करण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून शहरात सुरूवात झालेले आहे.
मंमादेवी मस्तगड मार्गे सुभाष चौक, मुथा बिल्डींग, ,महावीर चौक,जिंदल मार्केट,मामा चौक,वीर सावरकर चौक, हुतात्मा श्रध्दानंद चौक, नेहरू रोड काद्राबाद, मुर्ती वेस मार्गे छत्रपती शिवाजीमहाराज चौक येथे या शोभायात्रेचा समारोप होणार आहे.सामाजिक वनीकरण अधिकारी ,अमृत महोत्सव नदी संवाद यात्रेचे सचिव प्रशांत वरूडे,भाईश्री रमेशभाई पटेल, उद्योजक घनश्यामसेठ गोयल, उद्योजक शिवरतन मुंदडा, उद्योजक सुनिल रायठठ्ठा, उदय शिंदे,नितीन काबरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
…
शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटना,औद्योगिक वसाहतीतील उद्योग व विद्यार्थी ,महीला युवक यांच्यासह सर्व नागरिकांनी या संवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन कुंडलिका सीना रिज्यूवनेशन फाऊंडेशनच्या अध्यक्ष , समस्त महाजन ट्रस्ट, मुंबई च्या मराठवाडा प्रभारी नूतन देसाई यांनी केले आहे.
.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com