जालना- आई -वडील दोघेही भारतीय प्रशासन सेवेतून म्हणजेच आयएएस सेवेतून नियुक्त झालेले वरिष्ठ अधिकारी. असे असतानाही या दोन्ही अधिकाऱ्यांच्या पंधरा महिन्यांच्या मुलाला जिल्हा परिषदेच्या दरेगाव येथील अंगणवाडीत शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.आई-वडिलांच्या या निर्णयाचे जिल्ह्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे आणि आता या अंगणवाडीच्या गुणवत्ताते प्रमाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांची गुणवत्ता वाढेल अशी अपेक्षा होत आहे.
दहा महिन्यांपूर्वी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीमती वर्षा मीना यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे पती विकास मीना हे औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. दोघेही उच्च पदस्य अधिकारी असल्यामुळे गले लठ्ठ पगार, सर्व सुविधा आणि दिमतीला नोकर -चाकर अशा सर्व सुख सोयी आणि सुविधा उपलब्ध असताना देखील पंधरा महिन्याच्या अथर्व मीना याला जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीमध्ये भरती करून श्री. व सौ. मीना यांनी समाजापुढे एक नवीन आदर्श उभा केला आहे. खरं तर इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये देखील त्याला दाखल करता आलंअसतं आणि त्याच्यासाठी सरकारी यंत्रणा वापरता आली असती परंतु तसे न करता अथर्वला या अंगणवाडीत दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेत जर शिकली तर निश्चितच सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा सुधारेल अशी अपेक्षा आता व्यक्त व्हायला लागली आहे. अथर्वला या शाळेमध्ये भरती करण्यामागचा उद्देश सांगताना श्रीमती वर्षा मीना म्हणाल्या, “अथर्वला पंधरा महिने झाले आहेत आणि त्याला आता शाळेत भरती करण्याची वेळ आली आहे. सामान्य मुलांमध्ये त्याने वाढावे, खेळावे, आणि समाजाशी एकरूप व्हावे हा आपला उद्देश आहे. त्या अनुषंगाने त्याच्यासाठी शाळेचा शोध घेत असताना जालना जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कोमल चाटे यांच्याकडून माहिती घेतली आणि माझ्या निवासस्थानापासून दोन किलोमीटर अंतरावर दरेगावची अंगणवाडी असल्याचे समजले .त्यामुळे मी लगेच माझ्या मुलाला अंगणवाडीत घालण्याचा निर्णय घेतला. माझे स्वतःचे शिक्षण सरकारी शाळेत झालेले असल्यामुळे तेथील शिक्षणाबद्दल माझ्या मना त किंतु परंतु नाही. फक्त शिक्षक चांगले पाहिजेत एवढेच आपले मत आहे .ज्या शाळेत मुले हसत खेळत येतात ती शाळा चांगली. हा एकमेव निकष आपण लावला आहे. जिल्ह्यामध्ये दोन हजार अंगणवाड्या आहेत तेथील मुले देखील शिक्षणच घेत आहेत. त्यामुळे माझ्या मुलालाही अंगणवाडीमध्ये दाखल केले आहे. राहिला विषय भाषेचा, भाषेमुळे शिक्षणात कोणतीही अडचण येत नाही. भाषा हे फक्त माध्यम असल्याचेही श्रीमती वर्षा मीना यांनी सांगितले.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172