जालना -जालन्यासह एकूण मराठवाड्यावर पावसाची झालेली वक्रदृष्टी पाहता मराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही, त्यामुळे नद्या ,नाले, पिण्याच्या पाण्याचे जलसाठे कोरडे तर आहेतच त्यासोबत पिके ही अजून धोक्यात आहेत .त्यामुळे वरून राजाला साकडे घालण्यासाठी समस्त महाजन ट्रस्ट यांच्या वतीने पर्जन्य यज्ञ करण्यात आला आहे.
नवीन जालना भागात असलेल्या श्रीराम मंदिरात आज हा पर्जन्य यज्ञ झाला. यावेळी समस्त महाजन ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रभारी श्रीमती नूतन देसाई यांची प्रामुख्याने उपस्थित होते. पावसाळ्याचा तिसरा महिना असलेला ऑगस्ट महिना संपत आला तरी पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे वरून देवतेला साकडे घालण्यासाठी हा यज्ञ करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले .तसेच भविष्यात आनंदाने यज्ञ करू मात्र असे यज्ञ करण्याची गरज भासू नये असे अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मनोज महाराज गौड यांनी या यज्ञाचं पौरोहित्य केलं.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172