जालना- धर्माचे पालन करणे हा एक जिम्मेदारी आणि नैतिकतेचा मार्ग आहे .जो व्यक्ती नैतिक रूपाने प्राणिमात्रांमध्ये दयाभाव, आपलेपण ,अनुभवतो त्याचा विकास होतो. धर्माचा मार्ग त्याला शक्ती देतो., त्याच्यामध्ये त्याग, भाव, करुणा ,दया, वाढवतो आणि हीच त्या व्यक्तीच्या जीवनाची सर्वात मोठी उपलब्धी असते. असे विचार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मांडले आहेत.
जालना शहरात गेल्या दोन दिवसांपासून तेरापंथ समाजाचे आचार्यश्री महाश्रवणजी यांचा दीक्षा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात आज राज्यपाल देवव्रत यांची प्रमुख उपस्थिती होती. आचार्यांच्या व्यासपीठावरून अभ्यासपूर्ण भाषणातून देवव्रत यांनी राजकारण विरहित प्रवचनच केले. पुढे बोलताना राज्यपाल देवव्रत म्हणाले,” ज्या समाजाची विचारधारा महान, उदात्त आणि सर्वांच्या कल्याणाची असते त्या समाजाला पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जीवनात सर्वात मोठी जमेची बाजू कोणती असेल तर ती कर्म आहे !जसे कर्म केले जाईल तसे फळ मिळेल. राज्यपाल देवव्रत यांच्या मार्गदर्शनापूर्वी आचार्यश्री महाश्रवणजी यांनी राज्यपाल यांनी केलेल्या कार्याची प्रशंसाही केली आहे. राज्यपालांनी 40 मिनिटांच्या मार्गदर्शनामध्ये काय म्हटले आहे ते पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172