जालना
जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव येथील बद्री कल्याण घनगाव या युवकाने दावलवाडी ते सेलगाव दरम्यान एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्रकार 8 मे रोजी सकाळी उघडकीस आला.त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
बद्री घनगाव हा युवक 7 मे पासून मोटारसायकल घेऊन डोंगरगाव येथून बेपत्ता होता,नातेवाईकांनी चोहीकडे शोध घेतला मात्र तो सापडला नाही. दरम्यान 8 मे रोजी सेलगाव ते दावलवाडी दरम्यान एका शेतात सदरील युवकाचा मृत्यूदेह झाडाला लटकलेला आढळून आला असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
बद्री चे सात वर्षांपूर्वी लग्न झालेले असून एक मुलगा व एक मुलगी आहे असे समजते,घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Previous Articleसहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन
Next Article अन्नाची किंमत ओळखणारा” सालगडी”