छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील “प्रतिष्ठान” हे प्राचीन नाव असलेलं आजचं पैठण. गुरुवार दिनांक 22 रोजी नाथ षष्ठीचा मोठा उत्सव आहे. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत संत एकनाथ महाराजांची इथे समाधी आहे. महाराष्ट्रातील लाखो वारकरी संत एकनाथांच्या समाधीवर माथा टेकवण्यासाठी इथे येतात . नाथ षष्ठीचा हा सोहळा गुढीपाडव्यापर्यंत सुरूच असतो .वाहतुकीचे बदल खलील तक्त्याप्रमाणे
त्यासोबत गोदावरी गंगेच्या काठावर हे गाव वसलेले असल्यामुळे इथे जायकवाडी प्रकल्पाचे मोठे धरणही आहे. त्यासोबत भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करणारे ज्ञानेश्वर उद्यानही आहे. या सर्व बाबी लक्षात घेता इथे आलेले भाविक संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर ज्ञानेश्वर उद्यान आणि जायकवाडी धरण पाहिल्याशिवाय परत फिरत नाहीत . त्यामुळे शहरात मोठी गर्दी असू शकते . पोलिसांच्या अंदाजानुसार नाथषष्ठी साठी इथे सुमारे दहा ते बारा लाख भाविक येण्याची शक्यता आहे.
पैठणचे पोलीस पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याची मागणी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजी नगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत. हे बदल दिनांक 18 च्या मध्यरात्री पासून म्हणजेच आज मध्यरात्रीपासून ते शनिवार दिनांक 22 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत. विशेष करून जड वाहतुकीसाठी हे नियम काटेकोरपणे पाळले जाणार आहेत .कारण पैठण शहरातून होणारी जड वाहतूक शहरातील गर्दीला कारणीभूत होऊ शकते त्या अनुषंगाने तसेच कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून देखील या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहन चालकांनी आपली गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन देखील पैठणचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी केले आहे.
दिलीप पोहनेरकर www.edtvjalna.com
9422219172