जालना- विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल हरवल्याचा आणि चोरीला गेल्याच्या जालना जिल्ह्यामध्ये 1210 तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. या तक्रारीपैकी 252 मोबाईल पोलिसांनी शोधून काढले आहेत. त्यापैकी 115 मोबाईल हे सायबर सेलच्या शाखेने शोधून संबंधितांना परत केले आहेत.
केंद्र सरकारच्या दूरसंचार व दळणवळण विभागाने हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी संचार सारथी हे पोर्टल सुरू केले आहे .जुलै 2023 पासून सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे .या यंत्रणेचा फायदा पोलीस प्रशासनाला चांगलाच झाला आहे. त्यामुळे जुलै 2023 पासून जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 1210 मोबाईल हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती .त्यापैकी आतापर्यंत या पोर्टलच्या माध्यमातून 252 मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे 252 पैकी 115 मोबाईल हे सायबर शाखेच्या पोलिसांनी शोधून काढले आहेत आणि हे मोबाईल संबंधितांना परतही केले आहेत. मोबाईल सापडल्यानंतर ज्याचा मोबाईल आहे त्याच्या दुसऱ्या नंबर वर संदेश पाठवून त्या व्यक्तीला बोलावून मोबाईल परत केला जात आहेत. आजही अशाच प्रकारची मोहीम सायबर सेलच्या पोलिसांनी राबवली आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपाणी यांच्या हस्ते संबंधितांना हे मोबाईल परत केले आहेत. यावेळी सायबर शाखेच्या पोलीस निरीक्षक शालिनी नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, यांच्यासह या विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सायबर सेलच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की ज्यांचा मोबाईल चोरी झाला असेल किंवा हरवला असेल अशा नागरिकांनी स्वतःचे आधार कार्ड व पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीच्या प्रतीसह “सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर” या पोर्टलवर कामकाज पाहणाऱ्या संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना भेटून आपली फिर्याद या पोर्टलवर नोंद करावी आणि सायबर पोलीस ठाण्याची संपर्क करावा जेणेकरून हरवलेला मोबाईल लवकरात लवकर हस्तगत करण्यात मदत होईल .
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172