जालना- ब्राह्मण समाजामध्ये 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा असलेला उपनयसंस्कार आहे .मैत्रेय ग्रुप ब्राह्मण समाज जालना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक 28 रोजी सामूहिक उपनयन संस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये 29 बटुंवर उपनयन संस्कार करण्यात आले.
दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विखुरलेले कुटुंब, वेळेचा अभाव यामुळे या संस्कार सोहळ्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मैत्रेय ग्रुप ब्राह्मण समाज जालना गेल्या काही वर्षांपासून सामूहिक उपनयन संस्कार सोहळा आयोजित करीत आहे. रविवारी पार पाडलेल्या या सामूहिक उपनयन संस्कार सोहळ्याला सखाराम महाराज संस्थान लोणी येथील कल्याण महाराज जोशी, नाथसेवक शिवणगिरीकर महाराज वडोद कान्होबा, रामदास महाराज आचार्य, नाना महाराज पोखरीकर, अनंत महाराज देशपांडे, विनायक महाराज फुलंब्रीकर या महंतांची बटूंना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती होती.
अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये बटूंना वेगवेगळ्या बगीमध्ये बसवून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यथोचित सर्व सोपस्कार पूर्ण करून हा उपनयन संस्कार सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, भास्करराव आंबेकर ,भास्करराव दानवे ,राजेश राऊत, आदि राजकीय मंडळी देखील उपस्थित होती. या संस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व नातेवाईकांसाठी डॉ. मकरंद बोठे यांच्या वतीने मोफत उष्माघात प्रतिबंधक औषधीचेही वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मैत्रेय ग्रुप ब्राह्मण समाज जालनाचे अध्यक्ष संतोष दाणी तर या सामूहिक उपनयन संस्कार समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ.पवन देशमुख यांनी परिश्रम घेतले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172