जालना- समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्याच्या हद्दीत सेलगाव जवळ दोन ट्रकचा अपघात झाला . या अपघातामध्ये एका ट्रकचा चालक ठार झाला आहे तर दुसऱ्या ट्रकचा चालक फरार झाला आहे. आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
समृद्धी महामार्गावरून आज सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक सी जी15 बी96 84 हा खताने भरलेला ट्रक मुंबईकडून नागपूरकडे जात होता. या वाहनाचे समोरचे टायर फुटल्याने हळूहळू पुढे सरकत असलेल्या या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या कांद्याने भरलेल्या ट्रक क्रमांक डब्ल्यू बी 49 एन 15 46 या वाहनाने धडक दिली. यामध्ये या वाहनाचा चालक श्रीकांतालाल सरदार 41, राहणार माढा( पश्चिम बंगाल )हा जागेवरच ठार झाला आहे, तर त्याच्यासोबत असलेला सहचालक चंदू सरदार हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला जालना येथे सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे .
दरम्यान खताने भरलेल्या ट्रकचा चालक फरार झाला आहे घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक आर. के. निकम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अवघ्या पंधरा मिनिटात धाव घेऊन वाहतूक सुरळीत करून देऊन जखमींना रुग्णालयात पाठवले आहे. बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमठाणा शिवारात हा अपघात झाला.—-
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172