जालना- जालना शहराला पाणीपुरवठा करणारे घालीवाडी जलाशय कोणाचे ?मनपाचे ?का महाराष्ट्र शासनाचे. गेल्या अनेक वर्षांचा हा प्रश्न आता निकाली लागला आहे, कागदोपत्री जरी हे जलाशय महाराष्ट्र शासनाचे असले तरी मालक म्हणून मनपा आयुक्त आहेत. त्यामुळे आता या जलाशयाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देखील मनपायुक्तांचीच आहे .हे स्पष्ट झाले आहे. त्याच सोबत धरण सुरक्षा संस्थेच्या नियमानुसार आता धरणासंदर्भात काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार देखील त्या धरणाचे मालक असतील असेही निर्देशित केले आहे. तात्पर्य असे की घाणेवाडी जलाशयाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. सांडवा कधीही फुटू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तो दुरुस्त करावा या मागणीसाठी सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. परंतु मनपा प्रशासन आणि महाराष्ट्र शासन या दोघांच्या टाळाटाळीमुळे धरणाची दुरुस्ती झालेली नाही .आज शेवटी कुंडलिका सीना पुनरुज्जीवन संस्था, घाणेवाडी जल संरक्षण मंच, सृष्टी फाउंडेशन अशा अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेतली आणि याचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

दरम्यान या धरणाच्या दुरुस्ती संदर्भात बोलताना मनपा आयुक्त संतोष खांडेकर म्हणाले की,” दोन वर्षांपूर्वी जलसंधारण विभागाच्या मदतीने धरणाच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करण्यात आला होता .परंतु आता दोन वर्षानंतर या आराखड्यात वाढ झाली आहे. त्यासाठी जलसंधारण विभागाकडे पत्रव्यवहार करून हा आराखडा दुरुस्त करून देण्याची मागणी केली आहे. परंतु अद्याप पर्यंत तो आलेला नाही .तो तयार करणे ही जबाबदारी जरी त्यांची नसली तरी एक तज्ञ संस्था म्हणून त्यांनी तो आराखडा तयार करून द्यावा अशी विनंती त्यांना केलेली आहे. धरणाच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि दुर्घटना घडली तर त्यासाठी मनपा आयुक्त जबाबदार आहेत”. हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात जलसंधारण विभाग, पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हे धरण आमच्या कक्षेत येत नाही .त्यामुळे आमच्यावर हे प्रकरण ढकलण्यात काही अर्थ नाही असे सांगून एक सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही. याची पाहणी केलेली आहे आणि तसा अहवाल ही मनपाला दिलेला आहे. त्यानुसार दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे . परंतु आता ती वेळ निघून गेली आहे आणि पंधरा दिवसावर पावसाळा आला आहे, त्यामुळे यावर्षी तरी हे काम होणे शक्य नाही. मनपानेच जाहीर निविदा काढून यासाठी तज्ञ अभियंत्यांकडून देखभाल दुरुस्तीसाठी मार्गदर्शन घ्यावे .अशा सूचना आम्ही दिल्या असल्याचेही ते म्हणाले. त्यासोबत या धरणाच्या देखभाल दुरुस्ती संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे पुढील निर्णय ते घेतील असे या अधिकाऱ्याने सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी जालना जिल्ह्यातील नागरिकांचे पालक , प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांची या प्रकरणात मोठी जबाबदारी असून मनपा आयुक्त आणि जलसंधारण विभाग यांच्यात समन्वय साधून हे काम करून घेणे गरजेचे आहे. मनपा आयुक्तांनी देखील त्यांच्या तंबूतला हा चेंडू जिल्हाधिकारी आणि जलसंधारण विभागाकडे फेकला आहे आणि या संदर्भात आज विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतली आहे आणि हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. पुढील वर्षी जर या देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असेल तर त्याची सुरुवात आतापासूनच करावी लागणार आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version