जालना- ते एक कोटी रुपये गेले कुठे? असा प्रश्न जालना नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना केला आहे.
जालना शहरातील विविध समस्या संदर्भात माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी आज मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेतली, फक्त भेटच घेतली नाही तर आयुक्त उपस्थित नसल्यामुळे त्यांनी आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलनही केले .या भेटीमध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळात आणलेल्या विकास निधीचा आणि या विकास निधीमधून अर्धवट राहिलेल्या कामांचे. एका मोठ्या निधीचे आणि महत्त्वाचे काम होतं ते म्हणजे सभागृहाचं!. छत्रपती संभाजी उद्यानासमोर त्यावेळी जालना पालिकेचे विश्रामगृह होते जे आज अतिक्रमणाने वेढलेले आहे .खरं तर या विश्रामगृहाच्या मागेच आयुक्तांचे निवासस्थानही आहे अशा महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच विश्रामगृहासमोर एक सभागृह बांधण्यासाठी सन 2005 मध्ये त्यावेळी एक कोटी रुपये म्हणजे आजचे पाच कोटी रुपये ग्राह्य धरले जाऊ शकतात. अशाप्रकारे तो एक कोटी रुपयांचा निधी जालना नगरपालिकेला मिळालेला होता आणि आज 19 वर्षानंतर आजही तिथे त्यावेळेसचा जेवढा पाया होता तेवढाच पाया बांधलेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या संतापलेल्या आंबेकरांनी तो एक कोटी रुपयांचा निधी गेला कुठे असा सवाल उभा केला आहे.
यासोबतच इतर कामांकडे लक्ष वेधत असताना सतरा वर्षांपासून बीओटी तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या महात्मा फुले व्यापारी संकुलाची निवेदन निघूनही पुढे त्याचे काय झाले? शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जालना शहराच्या बाहेर घनकचरा प्रकल्प उभारण्याला त्यावेळी सुरुवात झाली होती आणि मशनरी ही खरेदी करण्यात आली होती. मात्र अजूनही तो प्रकल्प कार्यान्वित झाला नाही .जालनेकरांसाठी मोती बागेच्या बाजूला असलेला एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव गेल्या दहा वर्षांपासून बंदच आहे. उद्यानाचा खर्च भागविणारा छत्रपती संभाजी उद्यानातील मुलांसाठीची झुक झुक रेल्वे आणि शहरातील नागरिकांसाठी नयनरम्य असणारे कारंजी आजही बंद आहेत. शहराचे सांस्कृतिक वैभव असलेले मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह सन 2005 मध्ये लाखो रुपये खर्च करून नवनिर्मित करण्यात आले, परंतु गेल्या दहा वर्षांपासून ते मृताअवस्थेत आहे. त्यामुळे जालना शहरात साहित्यिकांचा, नाट्य रसिकांचा आणि कलावंतांचा कोंडमारा होत आहे. यासोबतच शहरातील मोकाट जनावरे, आरक्षित असलेल्या जमिनी, पथदिवे अशा सार्वजनिक समस्यांकडे भास्कर आंबेकर यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172