जालना- मुलींमध्ये आत्मविश्वास महत्त्वाचा आहे त्यांच्यामध्ये तो असतो परंतु संस्काराचा एक भाग म्हणून घरचीच मंडळी त्यांचा हा आत्मविश्वास कमी करतात. याउलट पोलीस प्रशासनात याच आत्मविश्वासाच्या जोरावर एक महिला पोलीस दहा पुरुषांना भारी पडते, त्याचे कारण तिचा आत्मविश्वास आहे. याच आत्मविश्वासाने आम्ही एखाद्या गुंडाला, एखाद्या हरामखोराला वटणीवर आणण्यासाठी आम्हाला दहापट हरामखोर व्हावे लागते. असे मत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी व्यक्त केले.
संभाजीनगर भागात असलेल्या शांतीनिकेतन विद्या मंदिरात “भयमुक्त विद्यार्थिनी संवाद” या कार्यक्रमात ते बोलत होते .शाळेतील विद्यार्थिनींना आत्मविश्वासाचे धडे देण्यासाठी आणि त्यांना भयमुक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, शिवसेनेचे पदाधिकारी बाला परदेशी, देवनाथ जाधव पत्रकार बद्रीनाथ टेकाळे आदींची उपस्थिती होती. दोन वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यामध्ये दामिनी पथक होते. त्यामुळे अनेक विद्यार्थिनींना सुरक्षित वाटत होते परंतु आता हे पथक अस्तित्वात नसल्यामुळे विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे आणि त्यांना अनेक रोड रोमिओच्या त्रासाला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे दामिनी पथक पुन्हा स्थापन करावे अशी मागणी श्री .आंबेकर यांनी केली.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com