जालना- न्यायालयीन कामकाज पाहणारी आणि राष्ट्र तसेच समाजाला समोर ठेवून काम करणारी, शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचावा या तत्त्वावर काम करत असलेली देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून वकिलांच्या “अखिल भारतीय आधीवक्ता” परिषदेकडे पाहिल्या जाते .त्या अनुषंगाने या संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेले अन्याय अत्याचार थांबवावेत असे या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. त्याच सोबत हिंदूंच्या वतीने वकीलपत्र घेणाऱ्या मुस्लिम वकिलाचा देखील खून करण्यात आला आहे. या घटनेचा देखील भारताने बांगलादेशाला जाब विचारावा , आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने हस्तक्षेप करावा या आणि अन्य मागण्यासाठी या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version