जालना- जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी जालना उपविभागाअंतर्गत संपादित केलेल्या जमिनीचा मोबदल बाजारभावाने देण्यात यावा .या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे .दरम्यान त्यापूर्वीच या परिसरातील शेतकरी दिलीप राठी यांनी देखील प्रशासनाला 5 फेब्रुवारीला आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता हळूहळू जनजागृती होत आहे आणि शेतकरी देखील एकवटले आहेत .आज या संदर्भात देवमूर्ती शिवारात शेतामध्ये सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला देवमूर्ती ,राममूर्ती ,खरपुडी, रामनगर, भागातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिलीप राठी यांनी अद्याप पर्यंत प्रशासन फिरकले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच आम्ही सकारात्मक भूमिका घेऊन प्रशासनासोबत चर्चा करायला तयार आहोत ,परंतु त्यांचे अधिकारीच येत नसतील तर आम्ही चर्चा करायची कोणासोबत? असा प्रश्न उपस्थित करून पाच तारखेचा आपण आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता मी एक नाही तर अनेक शेतकरी पाच तारखेला आत्मदहन करतील आणि हे प्रकरण किती वाढेल याचा विचार देखील प्रशासन करू शकणार नाही .ते पुढे म्हणाले की, अजूनही वेळ गेलेली नाही या सर्व प्रकाराला जिल्हा प्रशासनच जबाबदार आहे. असा आरोप करत प्रशासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरू नये अन्यथा महागात पडेल असा इशाराही दिला आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172