जालना- जालना जिल्ह्यातील आणि तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं सेवली हे शेवटचं गाव. त्यामुळे या गावचा फारसा विकास झाला नाही. भौगोलिक, दळणवळण आणि नागरी सुविधांबद्दल हे गाव जरी मागासलेलं असलं तरी याच गावामुळे अनेकांना दहावी पास होण्याचे भाग्य लाभलं आहे. इथे गावातील विद्यार्थ्यांशिवाय बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी ज्या दिवशी प्रवेश घेतला त्याच दिवशी समजावं की हा “ढ” आहे. ते यामुळे की येथील जालना जिल्हा परिषदेची शाळा ही केवळ दहावीच्या परीक्षा केंद्रासाठीच प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेतात आणि गावकरी आणि शाळेतील कांही शिक्षक देखील तेवढ्याच तत्परतेने विद्यार्थ्यांना पास करण्याची खात्री देतात. त्यामुळे अत्यंत सुंदर परिसर असलेला या शाळेची आजपर्यंत बदनामीच होत आली आहे. तुम्ही वर्षभर शाळेत नाही गेला तरी चालेल, परीक्षा नाही दिली तरी चालेल परंतु दहावी पास प्रमाणपत्र हे तुम्हाला खात्रीशीर मिळणार. अशा या बरबटलेल्या आणि बदनाम झालेल्या शाळेत गेल्या सहा महिन्यांपासून एक हिरा चमकत आहे आणि तो हिरा आहे इयत्ता दहावी मध्ये शिकणारी अनिता आसाराम काकडे.
दरम्यान जुन्या मातीच्या आणि गळक्या पत्रांच्या घरात शेणाने सारवलेल्या जमिनीच्या सुगंधामध्ये राहणाऱ्या अनिताने मिळवलेलं हे यश सेवली मध्ये जाऊन पैसे देऊन पास होणाऱ्यांसाठी मोठी चपराक आहे. जिद्द आणि गरिबी ही कधीही शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही हेच तिने दाखवून दिलं आहे. तिच्या या सर्व प्रवासाची प्रेरणादायी मुलाखत घेतली आहे सेवली येथील जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक परमेश्वर जाधव यांनी.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172