जालना- “आम्हाला हेच शिक्षक पाहिजेत” असे म्हणत भोकरदन तालुक्यातील बाबुळगाव शाळेच्या विद्यार्थिनी जालना जिल्हा परिषदेमध्ये येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्यासमोर रडल्या, एवढेच नव्हे तर तेच शिक्षक पुन्हा देणार! असे लेखी आश्वासन मागण्याची हिंमत या विद्यार्थिनींनी केली आहे. एवढेच नव्हे तर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे या शाळेवर शिक्षक असलेल्या जयंत यादवराव कुलकर्णी या शिक्षकाची विद्यार्थी प्रियता लक्षात येते.
भोकरदन- जाफराबाद रस्त्यावर भोकरदन पासून बारा किलोमीटर अंतरावर जालना जिल्हा परिषदेची ही शाळा आहे. एकूण 10 शिक्षक आणि दोन शिक्षकेतर कर्मचारी असे या शाळेवर नियुक्त आहेत. दरम्यान मागील आठवड्यामध्ये जालना जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आणि समायोजनामध्ये जयंत कुलकर्णी यांची बदली जालना तालुक्यातील सेवली येथे झाली. त्यानुसार त्यांच्या बदलीचे आदेशही निघाले आणि आज दिनांक सात रोजी ते सेवलीच्या शाळेत हजर झाले. हजर होताच मुख्याध्यापक परमेश्वर जाधव यांनी त्यांचे स्वागतही केले. एकीकडे कुलकर्णी यांचे स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र जयंत कुलकर्णी हेच शिक्षक पाहिजेत या मागणीसाठी बाबुळगावच्या विद्यार्थ्यांनी जालना जिल्हा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांचे दालन गाठले. यावेळी श्रीमती वर्षा मीना म्हणाल्या की, जसे तुम्हाला चांगले शिक्षक हवे आहेत तसेच त्या विद्यार्थ्यांना देखील चांगले शिक्षक असावे असे वाटतच असेल त्यामुळे सहकाऱ्यांसोबत विचार करून निर्णय घेऊ.
अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी *EDtv News अवश्य Subscribe करा* आणि बातमीबद्दल आपली *(Like Comment & Share)* प्रतिक्रिया द्या.बातमी वाचण्यासाठी www.edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या-9422219172