जालना -जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना या सोमवार दिनांक दहा तारखेपासून प्रसूती रजेवर जात आहेत. गेल्या अडीच वर्षांचा कार्यकाल त्यांनी पूर्ण केला आहे आणि पुढील सहा महिन्यांसाठी त्यांनी प्रसूती रजा टाकलेली आहे. त्यामुळे कदाचित रजा पूर्ण होईपर्यंत त्यांचा जालना जिल्ह्यातील कार्यकाल देखील समाप्त होऊ शकतो. म्हणूनच की काय त्यांना अधिकाऱ्यांच्या वतीने निरोप ही देण्यात आला आहे.” मी परत येण्याची शक्यता कमी आहे ,असं सूचक विधान देखील श्रीमती वर्ष मीना यांनी केलं आहे” गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकालात काय केलं ?काय करायचं होतं? आणि काय राहिलं? या सर्वांचा उहापोह त्यांनी पत्रकारांसोबत गप्पा मारून केला .दरम्यान एखाद्या  अधिकाराला काम करत असताना चांगले पत्रकार हे खूप महत्त्वाचे असतात त्यासोबत मला अनेक बाबतींमध्ये कडक कारवाई करायची होती परंतु ती राहून गेली .अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. माझ्या पाठीमागे मी कशी आहे याबद्दल बोलले जात होते. अनेकांना माझा स्वभावही आवडत नव्हता .परंतु काम करत असताना काही कडक निर्णय घ्यावेच लागतात आणि ते घेतलेच पाहिजे या मताची मी आहे “असेही त्यांनी सांगितले.( सविस्तर मनोगत पहा)

एकंदरीत अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जालना जिल्हा परिषदेत त्यांनी कशा पद्धतीने काम केले याची सर्व दिलखुलास गुपित ,खंत ,आणि अपेक्षा त्यांनी पत्रकारांसोबत बोलून दाखवल्या.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version