जालना- दहावी बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मेंदूला थोडा आराम दिल्यानंतर आता पुन्हा पुढे काय? या प्रश्नाने विद्यार्थी आणि पालक या दोघांच्याही मेंदूचा भुगा होत आहे. दहावी आणि बारावी हे दोन टप्पे आयुष्याच्या वाटेवर खूप महत्त्वाचे आहेत. किंबहुना हेच दोन टप्पे आपल्याला आयुष्याच्या वाटेवर मैलाचा दगड ठरतात आणि नियोजित ठिकाणी नेऊन पोहोचवितात. त्यामुळे वारंवार विचार करून आपल्याला हव्या असलेल्या क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा करून प्रत्येक जण आपली वाट निवडतो. ही वाट निवडत असताना सध्याच्या जगात क्लासेस हे एक महत्त्वाचं माध्यम समोर यायला लागला आहे. मग क्लासेस कसे निवडायचे? त्या क्लासेस चालकांकडे आपण कोणती चौकशी केली पाहिजे? त्यांच्याकडे काय असायला पाहिजे? क्लासेस सोबत वसतिगृह आवश्यक आहे? क्लासेस लावलेच पाहिजेत, का लावायचे असतील तर कुठे लावावे? त्याचे काय निकष आहेत? बराच वेळा अनेक पालक आपल्या प्रतिष्ठेसाठी मुलांना मोठमोठ्या शहरांमध्ये पाठवतात परंतु तिथले शैक्षणिक वातावरण या मुलांना झेपेलच असं नव्हे. मग मुलांच्या खाण्यापिण्याचे व्यवस्थेसाठी परिवारातील कोणीतरी सदस्य देखील तिथे राहतो. अशा परिस्थितीत त्या शहरातील शिक्षक जर जालन्यात असतील तर! तुमचे काय विचार आहेत. या सर्व प्रश्नांच्या भडीमारांचं उत्तर आज आपण शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून क्लासेस चालवत असलेल्या पी. एफ. सी. क्लासेसचे संचालक श्री. पाटील सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर पहा तुमच्या डोक्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.