जालना- जालना तालुक्यातील रामनगर येथे बंद असलेला जालना सहकारी साखर कारखाना सध्या शिवसेनेचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या ताब्यात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना बंद आहे. त्यामुळे कामगारांची देणे ही थकलेले आहेत. एकूणच या परिस्थिती संदर्भात अनेक वेळा आंदोलने झाली आणि ती शांतही झाली. परंतु पुन्हा काल गुरुवार दिनांक 3 रोजी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या भागामध्ये कारखान्याचे तत्कालीन कामगार आणि शेतकऱ्यांचा मेळावा घेतला . या मेळाव्याच्या प्रतिउत्तरामध्ये आज आमदार अर्जुन खोतकर म्हणाले,” कालपासून पुन्हा माझी खोटी बदनामी करणे सुरू केलेआहे. याद राखा गाठ माझ्याशी आहे मी एकालाही सोडणार नाही. कारखान्यातून रस्ता जाऊ द्यायचा किंवा नाही तो माझा प्रश्न आहे आणि आता तर रस्ता जाऊच देणार नाही. त्यांनी फक्त कामगारांच्या देणे देण्यापुरतं बोलायला हवं होतं. कोणाला कुठे दाबायचं हे आपल्याला चांगलं माहित आहे. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे जास्त भाष्य करणे देखील योग्य होणार नाही.”
दरम्यान येथील स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये युवा सेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचीही उपस्थिती होती त्यांनी देखील शिवसेनेची बाजू मांडताना अर्जुन खोतकर यांचा कौतुकच केलं तसेच ज्यांना निधी हवा आहे त्या ग्रामपंचायतींनी शिवसेनेच्या माध्यमातून काम केलेले दाखवावे आणि निधी घेऊन जावा असेही ते म्हणाले. घामाने डबडबलेला चेहरा असतानाही शिवसेनेची बाजू मांडायला आणि अर्जुनराव खोतकर यांचे कौतुक करायला ते विसरले नाहीत.
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.