जालना -मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त जे. इ. एस. महाविद्यालयात नुकतेच पुस्तक प्रदर्शन आणि कवी संमेलन पार पडले. महाविद्यालय आणि मराठी भाषा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्य हे कार्यक्रम घेण्यात आले.
यानिमित्ताने महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुर्मिळ पुस्तकांची आरास मांडली होती. पुस्तक प्रदर्शनानंतर महाविद्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये कवी संमेलनाचे ही आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलना पूर्वी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया सचिव श्रीनिवास भक्कड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री आणि शासनाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. मराठी भाषेविषयी उपस्थित मान्यवरांना महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला गेला. या समारंभा नंतर कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. औरंगाबाद येथील गुंजन पाटील, निलेश चव्हाण, यांच्यासह गझलकार डॉ. राज रणधीर, विनोद जैतमहाल, डॉ. एकनाथ शिंदे ,डॉ. शशिकांत पाटील डॉ. वसंत उगले या कवींनी या संमेलनात भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ.सुहास सदाव्रते यांनी केले. हा कार्यक्रम मराठी भाषा विभागाच्या वतीने डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. यशवंत सोनूने यांच्या पुढाकाराने पार पडला. कवी संमेलनामध्ये तरुणांना अपेक्षित असलेल्या” प्रेम” या विषयावर भर देण्यात आला . त्यांच्या या प्रेमाला कवयत्री गुंजन पाटील यांनी सुरुंग लावत” प्रेमात भ्रष्टाचार आहे” असा आरोप केला. कसा रंग भरला या कवी संमेलनात हे जसेच्या तसे आपल्याला चित्रफितीच्या माध्यमातून पाहता येईल.**
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com