जालना- GDCC, म्हणजेच ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन प्रकरणातील चार आरोपींना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांची तब्बल तीन महिन्यानंतर जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे ,तर याच प्रकरणातील मुख्य आरोपी किरण खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाने शनिवार दिनांक सहा पर्यंत खरात यांनी पोलिसांना शरण जावे असे आदेश दिले आहेत. जर ते शरण गेले नाहीत तर त्यांच्या पत्नीचा अंतरिम जामीनही रद्द केला जाईल अशी अटही उच्च न्यायालयाने घातली आहे.

त्यामुळे मोठा पेच खरात दांपत्यासमोर उभा राहिला आहे. या आदेशाची मुदत शनिवार दिनांक सहा रोजी संपत आहे. त्यामुळे उद्या काय घडामोडी घडतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
जालना जिल्ह्यामध्ये जेडीसीसी प्रकरणात फसवणूक झाल्याचा पहिला गुन्हा तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी दाखल झाला होता. त्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हेशाखे कडे गेला आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी पुणे आणि अन्य ठिकाणाहून चार आरोपी ताब्यात घेतले होते. ज्यामध्ये सय्यद इरफान अमोद मेहतर, व्यंकटेश भोई आणि रमेश उत्तेकर यांचा समावेश होता. त्यांच्याकडून करोडो रुपयांच्या आलिशान आठ गाड्याही जप्त केल्या आहेत, आणि वैयक्तिक मालमत्ता देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे. 14 दिवसांची पोलीस कोठडी उपभोगल्यानंतर दिनांक 18 फेब्रुवारीला या चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर चौघांनीही जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता या अर्जावर वारंवार सुनावण्या झाल्या आणि शेवटी जिल्हा न्यायालयाने जामीन नामंजूर केला. त्यासोबत किरण खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही सुनावणी सुरू होती. तो अर्ज देखील जिल्हा न्यायालयाने नाम मंजूर केला. त्यामुळे पर्यायाने या सर्वांनाच उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली, आणि दिनांक 3 मे रोजी म्हणजेच तब्बल तीन महिन्यानंतर न्यायालयाने चौघांना दिलासा देणारा आदेश दिला आहे. आणि त्यांची जामीन मंजूर केली आहे. परंतु अद्याप पर्यंत पोलिसांच्या हाती न लागलेले किरण खरात यांचा अटकपूर्व जामीन अर्जावर, न्यायालयाने अर्ज फेटाळून लावायचा की मागे घेता? अशी विचारणा केल्यावर केल्यावर अर्ज मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. किरण खरात यांनी सहा मे पर्यंत पोलिसांना शरण जावे असे आदेशही दिले आहेत. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने सहानुभूतीने विचार करत खरात यांच्या पत्नीला अंतरिम जामीन मंजूर केला होता .आता जर किरण खरात उद्या पोलिसांना शरण गेले नाहीत तर खरात यांचा देखील अंतिम जामीन रद्द होऊ शकतो त्यामुळे खरात दांपत्य काय निर्णय घेतात याकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेल्या चारही आरोपींना दिनांक 3 मे रोजीच जामीन मंजूर करण्यात आला होता मात्र त्याचे आदेश संबंधिताच्या हातात उशिरा पडल्याने आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करायला वेळ लागला, आणि दिनांक चार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हे जिल्हा कारागृहातून बाहेर आले आहेत. तूर्तास या चौघांचा जिल्हा कारागृहातील मुक्काम संपला असला तरी पोलिसांनी न्यायालयामध्ये सुमारे अडीच हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्यामुळे लवकरच या दोषारोप पत्रावर सुनावणी सुरू होईल आणि पुन्हा एकदा या चौघांना वकिलामार्फत किंवा न्यायालयाने आदेश बजावल्यानंतर स्वतः जिल्हा न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version