जालना- पूर्वजांनी केलेल्या सत्कर्मामुळेच आपला जन्म भारतात झाला आहे .असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय संपर्कप्रमुख तथा आसाम प्रांतच्या प्रचारिका नीता देवी यांनी केले आहे.राष्ट्रसेविका समिती देवगिरी प्रांतच्या वतीने दिनांक पाच ते 20 मे दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.अमृता कुलकर्णी यांनी उपस्थित तरुणींना मार्गदर्शन करताना सांगितले की, तरुणींनी शारीरिक सबलीकरणासोबतच मानसिक धैर्य आणि मनावर ताबाही ठेवला पाहिजे हे सर्व करण्यासाठी सकस आहार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान या शिबिराच्या समारोपाच्या पूर्वी राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून पथसंचलनही केले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com