जालना -दत्तात्रय प्रभूंचे अनेक अवतार आहेत. त्यामधील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला. काही भाविक या ठिकाणाला पिठापुरम असे देखील म्हणतात .पिठापूर येथे श्रीपाद वल्लभ यांचे भव्य दिव्य मंदिर आहे. परिसरात भाविकांना निवासाची मोफत व्यवस्था आहे. नित्यनियमाने काकड आरती, अभिषेक ,नैवेद्य आणि सायंकाळी पंचपदी असा नित्य नियम येथे चालतो. भाविक दिवसभर गुरुचरित्राचे पारायण देखील इथे करतात. कर्नाटकातील गाणगापूर, महाराष्ट्रातील नरसोबाची वाडी या ठिकाणांप्रमाणेच आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात असलेल्या या पिठापुरमला अत्यंत महत्त्व आहे. या मंदिराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या पादुका मंदिरा बाहेर निघाल्या आहेत आणि गेल्या पंधरा दिवसांपासून विविध ठिकाणी भाविकांना दर्शन देत दिनांक 22 रोजी रात्री जालना शहरातील कचेरी रोडवर असलेल्या श्री. बालाजी मंदिरात त्या आल्या आहेत .दिनांक 23 रोजी पहाटे अभिषेक मिरवणूक प्रसाद आणि नंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्या परभणीकडे मार्गस्थ होणार आहेत.
पीठापूरचे महत्व-श्रीपाद-श्रीवल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे .तेथे रोज श्रीदत्त-महाराज भिक्षेस येतात. तसेच पादगया हे ठिकाणही श्रीक्षेत्र पीठापूर येथे आहे. तेथील मंदिरासमोरच्या तीर्थ कुंडामध्ये गयासुराचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे. या क्षेत्रामध्ये स्वत: भगवान शंकर कुक्कुटेश्वराच्या रुपामध्ये आहेत. पिठापूर येथे पिंडदान करण्यालाही मोठे महत्त्व आहे. पिठापूर पासूनच सुमारे 15 किलोमीटरवर उफाडा हे ठिकाण आहे या ठिकाणी सुंदर आकर्षक साड्या मिळतात विशेष करून या साड्यांवर हाताने नक्षीकाम केलेले असते त्यासोबत येथून जवळच उफाडा बीज आहे म्हणजेच समुद्रकिनाऱ्यावर देखील पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता येतो.
https://edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर, mob 9422219172