पंढरीच्या वारी मधून- माऊलींच्या पालखीसोबत असंख्य वारकरी चालत राहतात पालखीसोबत चालण्यासाठी अधिकृत नोंदणी करावी लागते.ही नोंदणी केल्यानंतर त्या वारकऱ्यांची पूर्ण व्यवस्था संस्थान करते.

ज्या ठिकाणी माउलींचा रथ मुक्कामी राहणार आहे त्या ठिकाणी संस्थांच्या वतीने या वारकऱ्यांसाठी राहुुुुट्यया टाकल्या जातात. ही यंत्रणा वेगळीच असते. पहाटे उठून वारकरी रथासोबत निघाल्यानंतर या त्या काढून वेगळ्या वाहनांमध्ये भरून पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन उभ्या केल्या जातात. दरम्यान वारकऱ्यांसाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचं जेवण ही व्यवस्था ठरलेल्या ठिकाणी केल्या जाते. ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या परिसराच्या अवतीभोवती असलेल्या मोकळ्या रानात ही व्यवस्था करण्यात येते.

ज्या वारकऱ्यांनी नोंदणी केली नाही मात्र आपापल्या परीने रथासोबत चालत जातात अशा वारकऱ्यांना मात्र निवासाची व्यवस्था स्वतःलाच करावी लागते. परंतु दिवसभर चालत असताना, स्नान, अन्न- पाणी मिळण्याची कुठलीही काळजी करण्याची गरज. नाही ठीक ठिकाणी मोफत अन्न पाणी वाटप केले जाते. त्यामुळे रथासोबत चालायचे असेल तर गरज फक्त इच्छाशक्तीचीच असते. माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आनंदोत्सव आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा EDTV NEWS हा प्रयत्न.

अधिक बातम्या पहाण्यासाठी https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version