जालना-मणिपूर येथे झालेल्या महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या विविध विभागाच्या वतीने आज जालन्यात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.गांधी चमन येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याचा समारोप झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, युवती महिला जालना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित महिला कामगार या विविध विभागाच्या संयुक्त विद्यमाने या मोर्चाच्या आयोजन करण्यात आले होते. मणिपूर येथे घडलेल्या निंदनीय घटनेचा निषेधही यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे महिलांच्या या मोर्चामध्ये शालेय विद्यार्थिनी जास्त दिसत होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची संख्या जास्त होती आणि त्यांना आणून सोडून घेऊन जाण्याची ही व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान या संदर्भात बोलताना आ. टोपे म्हणाले की युवतींना देखील त्यांच्या भावना व्यक्त करता याव्यात म्हणून त्यांची उपस्थिती होती. आजच्या या कार्यक्रमाला रेखा तौर, शितल बरोटे ,माजी नगरसेविका मनकर्णा डांगे, पल्लवी महाले, प्रेरणा भालके, वंदना खांडेभराड, लता जोशी, सविता कांबळे आदींची उपस्थिती होती.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version