जालना- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे .काही ठिकाणी आचारसंहितेचा बागुलबुवा, तर काही ठिकाणी आचारसंहितेची पायमल्ली होताना दिसत आहे ,आज या दोन्ही गोष्टी एकत्र आणि एकाच ठिकाणी पाहायला मिळाल्या. जालना शहरातील गांधी चमन हे आंदोलनाचं महत्त्वाचं ठिकाण. या ठिकाणी आचारसंहितेची पायमल्ली झाली. त्यामुळे पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तो म्हणजे आम आदमी पार्टीचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री अटक करण्यात आली त्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गांधी चमन येथे घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. सध्या जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश आहेत आणि आचारसंहिता ही लागू आहे, त्यामुळे या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भारतीय जीवन बीमा निगम चे सहाय्यक तथा आचारसंहिता पथक प्रमुख गजानन व्यंकटराव गुजलवाल यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात ,संजोग हिवाळे, सुभाष देठे, फिरोज बागवान, तनुज बाहेती, समाधान खरात आणि अन्य सात -आठ कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे .
दुसऱ्या प्रकरणात आचारसंहितेचा बागुलबुवा करत जालना शहरात असलेल्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत, काही नवीन अतिक्रमण धारकांना टार्गेट करणाऱ्या महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला एका अतिक्रमण धारकांनी चांगले झापले. सर्वांसमक्ष शिवीगाळ करून धमकीही दिली .परंतु या चौकात इतरही अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात आहेत मग ते कसे? असे म्हणत या नवीन अतिक्रमणधारकाने वाद सुरू केला ,हा वाद विकोपाला जाण्यापूर्वीच या स्वच्छता निरीक्षकाने तेथून काढता पाय घेतला. सर्वांसमक्ष, भर चौकात एका स्वच्छता निरीक्षकाने हे निमूटपणे सहन केले. त्यामुळे या स्वच्छता निरीक्षकाने हे सर्व का सहन केलं? अशी चर्चा सुरू होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172