जालना- परतुर तालुक्यातील अकोली या गावात विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार गावातीलच सिद्धेश्वर सोळंके यांनी करून जालना जिल्हा परिषदेसमोर काही महिन्यांपूर्वी उपोषण केले होते .विहीर हरवली पाझर तलावात पाणी तर साचले नाही परंतु तलाव मात्र पाझरून गेले, गटार “भूमिगत झाले, रस्ते गायब झाले आधी कामांची चौकशी करण्याची त्यांची मागणी होती.
त्यानंतर जिल्हा परिषदेने चौकशी समिती नियुक्त केली होती. परंतु दीड महिना उलटूनही ही समिती चौकशीला आलीच नाही. त्यामुळे पुन्हा दिनांक 9 मे रोजी या गावकऱ्यांनी जिल्हा परिषद गाठून चौकशीची मागणी केली .त्यानंतर घनसावंगी चे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने शुक्रवार दिनांक 16 रोजी अकोली या गावात सहा सदस्यांमार्फत पाहणी केली .
सुरुवातीला ग्रामपंचायत मध्ये तक्रारदार आणि सरपंच यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर या कामाच्या तपासणीसाठी तीन गट तयार करण्यात आले आणि एकाने रस्त्याची, दुसऱ्याने गावातील गट्टू बसवण्याची आणि भूमिगत गटारीची पाहणी केली. तर तिसऱ्या गटाने विहिरी आणि पाझर तलावांची पाहणी केली .या पाहणी दरम्यान भर उन्हामध्ये या चौकशी समितीला राणावानामध्ये फिरावे लागले. चौकशी समितीने काय पाहिले ?कुठे पाहिले? हे सर्व वरील व्हिडिओमध्ये आहे .दरम्यान गायब झालेल्या विहिरी पाझर तलाव, रस्ते आणि भूमिगत गटार यांचा शोध लागला की नाही ?याचा अहवाल ही समिती वरिष्ठांना देणार आहे .त्यामुळे काही दिवस तरी वाचकांना या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172