Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » बदललेली जीवनशैलीच वाढत्या नैराश्याचे कारण- अच्युत गोडबोले
    Jalna District

    बदललेली जीवनशैलीच वाढत्या नैराश्याचे कारण- अच्युत गोडबोले

    EdTvBy EdTvApril 5, 2022No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- बदललेली जीवनशैली आणि त्यामधून समाजावर होणारा परिणाम त्यामुळेच नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबत आपण सहकार्य न करता स्पर्धा करत आहोत हेदेखील एक मुख्य कारण या नैराश्याचा आहे. त्यामुळे सध्या 17 टक्के असलेले हे प्रमाण 2025 पर्यंत  25 टक्के होईल असे भाकीत लेखक, तंत्रज्ञ, वक्ते, अच्युत गोडबोले यांनी केले आहे

    शहरातील नाव्हा चौफुली परिसरातील मानस हॉस्पीटल येथे मानस फाऊंडेशन उदघाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त भारतीय नौसेना अधिकारी सर्जन कमोडोर सुनील गोयल हे होते. या वेळी गेवराई येथील बालग्रामचे प्रमुख संतोष गर्जे, मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ.प्रकाश आंबेकर, डाॅ.शीतल आंबेकर हे होते. प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.

    कार्यक्रमात बोलतांना अच्युत गोडबोले म्हणाले की, आजची विविध क्षेत्रातील स्पर्धा पाहता या तुलनेत खरा जगण्याचा आनंद दूरावत चाललो असल्याचे सांगितले. समाजात वावरताना आपले आदर्श कुठले आहेत,याचा गांभीर्यने विचार केला पाहिजे.पैसा,प्रसिध्दी आणि स्पर्धा या चौकटीत न राहता व्यापकपणे आणि दिलखुलासपणे जीवन जगता आले पाहिजे,असा सल्ल्ही श्री.गोडबोले यांनी दिला. स्वतः आत्महत्येचा आलेला विचार आणि परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जाताना मुलाच्या आजाराने धक्क्यातून सावरत नवी दिशा कशी मिळाली,असे अनुभवही श्री.गोडबोले यांनी कथन केले.तीन दशके आय आयटी काम, अडीच दशके विविध कंपन्यात सीईओ अनुभवासह १५० देशाचा जगप्रवास कसा केला याचे काही अनुभव मांडत कार्यक्रमात प्रेरणादायी संदेश श्री.गोडबोले यांनी दिला.बदलते समाजमन आणि परिस्थितीत मनोविकाराचे प्रमाण अधिक वाढत आहे असे सांगून जालन्यात मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी मानस फाऊंडेशन काम म्हणजे नवी दिशा होय,असेही श्री.गोडबोले यांनी समारोपात बोलताना सांगितले. अध्यक्षीय समारोपात बोलताना सर्जन कमोडोर सुनील गोयल म्हणाले की, आजच्या परिस्थितीत मानसिक आरोग्य ही मोठी समस्या बनत आहे.ज्याप्रमाणे शारिरीक आरोग्य बिघडले की,दवाखान्यात आपण जातो,परंतु मानसिक आरोग्याबाबत तसे करीत नाही.मानसिक आरोग्याबाबत समाजात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत,अशा विषयावर मानस फाऊंडेशनने कार्य सुरु केले,ही गौरवाची घटना असल्याचे श्री.गोयल यांनी सांगितले.मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ.प्रकाश आंबेकर प्रास्ताविकात भूमिका मांडताना म्हणाले की,आपण समाजाचे देणं लागतो,या भूमिकेतून मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी मानस फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली.मानसिक आजार इलाज करण्यासाठी लोक दवाखान्यात न जाता अंधश्रद्धा ठेवून इतर ठिकाणी जातात,हे चूकीचेच असल्याचे डाॅ.आंबेकर यांनी सांगितले. कार्यक्रमात बालग्रामचे संतोष गर्जे, विनोद जैतमहाल यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमास परतूर येथील दामोदर औटे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.अश्विनी कायंदे हिने स्वागतगीत, पसायदान सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.सुहास सदाव्रते, डाॅ.सुजाता देवरे यांनी केले.संयोजन समिती सदस्य डाॅ.यशवंत सोनुने यांनी आभार मानले.कार्यक्रमास संयोजन समिती सतीश खरटमल, गौरीशंकर चव्हाण, बाबासाहेब डोंगरे,
    सचिन महाजन, डाॅ.प्रणिता राठोड, सुनील सोलाट, स्वप्नील रगडे यांनी प्रयत्न केले.

    समुपदेशन केंद्र
    मानस फाऊंडेशन आणि अंकुशराव टोपे महाविद्यालय मानसशास्त्र विभाग समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त सहकार्याने मानसिक आरोग्य जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे डाॅ.सुजाता देवरे यांनी सांगितले.

    https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
    *दिलीप पोहनेरकर*
    ९४२२२१९१७२
    https://edtvjalna.com

     

    dr. ambekar edtv godbole manas foundtion
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleबौद्ध धर्म हा आचरणाचा धर्म- भदंत श्रवण अशोक
    Next Article अल्पवयीन मुलीचे शाळेतून अपहरण.
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    May 28, 2025

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    May 28, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,133 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025971 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025512 Views
    Don't Miss
    Breaking News May 31, 2025

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    जालना- जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . या…

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.