जालना-ज्याअर्थी शिक्षित माणसाची ओळख करून देतांना ” शिकला- सवरलेला आहे” अशी करून दिली जाते, त्यावरून माणसाच्या आयुष्यात शिक्षण हे सावरण्यासाठी घेतात हा अर्थ अभिप्रेत आहे आणि माणसाला खऱ्या अर्थाने सावरण्याचे काम दर्जेदार शिक्षणाबरोबरच त्याच्यावर झालेले मूल्यसंस्कार करत असतात, असे प्रतिपादन वक्ते, कवी व इंग्रजी साहित्याचे अभ्यासक डॉ.दिगंबर दाते यांनी केले. डाॅ. दाते हे मत्स्योदरी विद्यालय, जालनाच्या वतीने दि. 17 रोजी संस्कार दिनानिमित्त आयोजित ” आजचे शिक्षण व मूल्यसंस्कार ” या विषयावर व्याख्यान देतांना बोलत होते.
पुढे बोलतांना डॉ.दाते म्हणाले ,कितीही प्रतिकूल परिस्थिती ओढावली तरी गुणवत्ता व नैतिक मूल्य ढळू न देता लक्षकेंद्रीत- प्रयत्नातून असाध्य तेही साध्य करता येते.या वेळी मुख्याध्यापक श्री. पैठणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना परीश्रमाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाची सुरूवात कै. कर्मयोगी अंकुशरावजी टोपे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. पाहुण्यांचा परिचय सहशिक्षक विजय सुरासे यांनी करून दिला. तर सूत्रसंचालन श्रीमती गायके यांनी केले. शेवटी आभारप्रदर्शन श्री. आरेकर यांनी केले. यावेळी सहशिक्षका श्रीमती काळे, श्रीमती लामतूरे, सहशिक्षक श्री. कानडे, श्री आरेकर, श्री सुरासे, श्री नागलवाड, श्रीमती गायके, श्रीमती फोलाने यांच्यासह असंख्य विद्यार्थी- विद्यार्थ्यीनी उपस्थित होते.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172