जालना-विशाल विकासलाल जयस्वाल व सौ.अश्विनी विशाल जयस्वाल सकाळी साडेपाच वाजता अंबड रोडवर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी त्यांची नजर रस्त्याच्या शेजारी पडलेल्या फोनवर पडली. हा फोन सोबत घेऊन ते घरी आले.पण तो लॉक होता. मग घरी आल्यानंतर त्यावर दुसऱ्या नंबर वरून कॉल आला, कॉल उचलला असता मी अर्जुन देवराव शेजवळ बोलतोय आणि तुम्हाला सापडलेला मोबाईल माझा आहे असे एका व्यक्तीने सांगितले. मग ते त्यांना भेटण्यासाठी माऊली किराणा अंबड रोडवरील दुकानावर बोलवले. दुकानावर आल्यानंतर त्यांनी आधार कार्ड व इतर कागदपत्रे दाखवली आणि फोनचे वर्णन विचारल्यावर ते योग्य आहे असे कळाले आणि खातर जमा करण्यासाठी फोनचा लॉक त्यांना उघडायला लावला तर फोन अनलॉक झाला. यावरून हा फोन त्यांचाच आहे अशी खातर जमा झाल्यानंतर त्यांचा फोन त्यांच्याकडे सुपूर्द केला.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172