जालना -सरसकट आरक्षणासंदर्भात प्रश्नचिन्हच ?आहे. जे टिकेल ते घ्या, नको तो हट्ट धरला तर संघर्षाला सामोरे जावे लागेल !असं मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं आहे, महामंडळाच्या कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी श्री .पाटील हे आज जाळण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील महत्त्वाच्या बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडली या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील बोलत होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे कर्ज मागण्यासाठी बारा हजार 300 अर्ज आले होते ,त्यापैकी 3521 लाभार्थ्यांना या कर्जाचा फायदा झाला आहे तर दहा हजार 234 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्यापैकी 228 कोटी कर्जवाटप झाले आहे महामंडळाने आत्तापर्यंत 30 कोटींचे व्याज बँकांना परत केले आहे. राष्ट्रीयकृत बँका कर्ज वाटपामध्ये चालढकल्पना आणि हलगर्जीपणा करतात आणि जालना जिल्ह्यामध्ये याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे यापुढे बँकांनी जर कर्ज नाकारले तर त्याविषयी खुलासा देखील त्यांना करावा लागणार आहे यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँकांना समज द्यावी असे मतही श्री. पाटील यांनी व्यक्त केले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172