जालना- ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून व जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात झाली. जालना जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या उमेद या विशेष विभागामार्फत महिला बचत गटांची ही योजना राबविल्या जाते. महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंचे “जानकी महोत्सव 2024 “हे प्रदर्शन आज पासून सुरू झाले आहे. जुन्या जालन्यातील स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दिनांक बावीस पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

जालना जिल्ह्यामधील आठ तालुक्यात एकूण 16,679 स्वयं सहाय्यता बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एक लाख 71 हजार 126 कुटुंबांना समाविष्ट करण्यात आले आहे. आज या उद्घाटनाच्या वेळी जिल्हाभरातून महिलांची आलेली संख्या उल्लेखनीय होती .अपेक्षे पेक्षाही जास्त प्रतिसाद या “जानकी महोत्सव 2024 “ला पाहायला मिळाला. अडीच हजार महिलांची आसन व्यवस्था या सभा मंडपात करण्यात आली होती ,परंतु सुमारे 4000 महिला या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे दिसून आले.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version